आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत



गुरुजींचे गुरु पौर्णिमेच्या दिवसाचे  प्रवचन 
मोन्त्रिअल, १५ जुलै  २०११ : 

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. तुमचे आयुष्य गुरु तत्व आहे. तुमच्या आयुष्यावर एक प्रकाश झोत टाका. ज्ञान जे तुमच्या आयुष्यातून उजळेल - तुम्ही आदर दिला पाहिजे, आणि त्यालाच गुरूचा आदर म्हणतात.  हे पहा, आयुष्याने तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवल्या आहेत - तुम्ही काय चुकीचे केले आणि काय बरोबर केले, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रकाश टाकला नाही, तर गुरु तिथे नसतो.  तुमच्या आयुष्याकडे बघा आणि आयुष्याने दिलेल्या ज्ञानाचा आदर करा. त्यालाच गुरूचा आदर म्हणतात. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? हे काहीतरी महत्वाचे आहे.

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. तुम्ही आयुष्यावर प्रकाश टाकता, आणि जेंव्हा ज्ञान असते, ज्ञानाचा आदर करा. ज्ञान हेच गुरुतत्त्व आहे. तर, तुमच्यामध्ये गुरु तत्व आहे, ज्ञान आहे. प्रत्येकामध्ये ज्ञान आहे.  त्यावर प्रकाश टाका. आयुष्यात ज्ञान म्हणजे पाहत आहे; ज्ञान आले आहे;ज्ञानाचा आदर करा. आपण जेंव्हा ज्ञानाचा आदर करणे थांबवतो तेंव्हा अंधार येतो, तेंव्हा  पौर्णिमेचा चंद्र नसतो, तिथे चंद्रच नसतो. चंद्र म्हणजे मन आणि आणि जेंव्हा तो ज्ञानाने पूर्ण भरलेला असतो तेंव्हा गुरु पौर्णिमा असते. त्यामुळे जेंव्हा तुम्ही आयुष्याने काय शिकवले त्याचा आदर केलात तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी गुरु पौर्णिमा असू शकते.

बऱ्याच वेळा आपण आपले तोंड दुसरीकडे फिरवतो, डोळे बंद करतो आणि आपल्या इच्छा गिळून टाकतो. मला हे, हे, हे आणि हे हवे आहे - ज्ञानाचा मान न ठेवता आपण इच्छा गिळून टाकतो.  हे पहा, देणाऱ्याने तसेही दिले आहे, त्याने तुम्हाला खूप काही दिले आहे. पहिली गोष्ट ही की ज्ञानाचा आदर ठेवा, दुसरी गोष्ट अशी की या गुरु पौर्णिमेला तुम्हाला दिली गेलेली भेट वापरा.  तुम्हाला खूप आशीर्वाद दिले गेले आहेत. तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांचा वापर करा आणि तुम्हाला अजून मिळेल. त्देणारा न दमात देत आहे आणि तुमच्याकडून काही ओळख पण नकोय आणि तुम्हाला असे भासवतो की ते तुमचेच आहे.  देणारा देतो आणि तुम्हाला अशी भावना देतो की ते तुम्ही मिळवले आहे. देणाऱ्याला अंत नाही, आणि देण्याने तो दमणार पण नाही, देणारा देतो;  अनंत तुम्हाला भरपूर देत राहतो, आणि आपल्याला जे मिळाले आहे ते आपण चांगल्यासाठी वापरले पाहिजे.

तुम्हाला एक चांगले भाषण दिले आहे; ते चांगल्यासाठी वापरा. तुमचे भाषण तक्रारींसाठी, आरोपांसाठी, वाईट गोष्टी बोलण्यासाठी वापरू नका. तुम्हाला उत्तम बुद्धी दिली आहे, बुद्धी वापरा. लोक बुद्धी वापरण्यामध्ये इतका कंजूसपणा का करतात ते मला कळत नाही.   तुम्हाला वाईन माहित आहे, ती जेवढी जुनी होईल तेवढी चांगली आणि महाग होत जाते. मी असे  ऐकले आहे, वाईन कधी घेतली नाही. त्याच प्रमाणे बुद्धी वापरा ती चांगली होत जाईल. आपण ते जेव्हडे चांगल्यासाठी वापरू, तेव्हडी ती जास्त तरतरीत होत जाईल. काळजी करू नका. तुम्ही असा विचार करू नका की बुद्धी वापरल्याने कमी होईल. ती न वापरल्याने, ती कमी होईल. तुमची बुद्धी चांगल्यासाठी वापरा. तुमचा आवाज सुस्वर असेल, तर चांगल्यासाठी वापरा. तुमच्या शरीरात ताकद आहे, सेवा करा.  तर, आपल्याला जे काही दिले गेले आहे, ते चांगल्यासाठी वापरा. जेंव्हा मी चांगल्या वापरासाठी म्हणतो, तेंव्हा ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, जगासाठी वापरा. देवत्व जगात राहते. तर जगाची सेवा करणे म्हणजे देवत्वाची पूजा आहे.

ज्ञानाचा आदर केल्याने आयुष्याचा स्तर उंचावतो. आणि तुम्हाला हे दोन जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा तुम्ही कृतज्ञ होता आणि जेंव्हा तुम्ही कृतज्ञ होता, भावनांनी पूर्ण, तेंव्हा ते अनंताला भावते. एवढेच  !

हे जाणून घ्या की प्रत्येकामध्ये गुरु आहे आणि ज्ञानाचा प्रकाश देतो आहे, तिथे आरती करा, तिथे आत असलेल्या गुरु साथी. आरती करणे म्हणजे काय? परमानंद, अशा परमानंदामध्ये ज्ञानाबरोबर जाणे, आयुष्याने आपल्याला काय दिले आहे त्यावर प्रकाश टाकणे. सत्य काय आणि असत्य काय? बरोबर काय आणि चूक काय? आपण जे बरोबर नाही ते का निवडले, ते करायला आपल्याला कशाने भाग पडले आणि बरोबर काय आणि चूक काय? हे तुम्हाला कुणाला विचारायला नको. तुमच्या आतले काहीतरी तुम्हाला सांगते. हो की नाही? आत काहीतरी टोचते, हे चुकीचे आहे. त्याचा आदर करा, आदर करा! तुम्ही ऐकत आहात? सगळे?

हे खूप सोप्पे आहे, तरी गहन आहे.

तुम्हाला माहिती आहे, धार्मिक असणे आणि धार्मिकता न दाखवणे ही एक सुंदर गोष्ट आहे. जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि भेटवस्तू दिल्याची भावना दिली, तर ती भेट आहे? बघ, मी तुला भेट देतो आहे, मी तुला भेट देतो आहे. दहा वेळा कोणीतरी सांगते आणि हातात चोकलेट देते, तुम्ही काय म्हणता? तुझ्याकडेच ठेव, मला नको. त्याचप्रमाणे जेंव्हा धार्मिक असूनही आपण धार्मिकता दाखवत नाही; मी बरोबर आहे, मी बरोबर आहे. धार्मिकता दाखवणे राग आणते, निराशा आणते आणि या ना त्या दृष्टीने चुकीचे ठरवते. एका दृष्टीने तुम्ही बरोबर असाल. दुसऱ्या दृष्टीने तुम्ही चूक असता. तुम्ही माझ्याबरोबर  आहात ना? याचा काही अर्थ आहे का? बरोबर असणे आणि धार्मिकता न दाखवणे, शुद्ध असणे आणि त्याचा अभिमान नसणे, दयाळू असणे आणि त्याचे प्रदर्शन न मांडणे - मी काय म्हणत आहे ते तुम्हाला दिसते आहे का?  हुशार असणे आणि ' पहा मी किती हुशार आहे' असा बाजा न वाजवणे - त्यातला रस निघून जातो, बरोबर, तुम्ही काय म्हणता? हुशार असणे आणि स्वाभाविक असणे, अगदी स्वाभाविक, साधे, साधेपणा; कधी कधी  मूर्ख बनायला पण तयार असणे. हे खूप सुंदर ज्ञान आहे. तुमचे आयुष्यच हे तुमच्याकडे आणते आणि तुमच्या आयुष्यात दाखवते. तुमच्या आयुष्यावर चिंतन करा, परत परत आणि परत आणि परत आणि परत. खूप छान!

खोलीच्या शेवटी लांब इकडे तिकडे करणाऱ्या लोकांकडे पाहून, श्री श्री म्हणाले:

काही लोक असतात की जे सारखे वर खाली जात असतात, त्यांना माहित नसते की कुठे जायचे किंवा काय करायचे. तिथेच आपल्याला मार्गदर्शक लागतो, एक गुरु, काही लोक त्याच रस्त्यावरून वर खाली करत असतात, दार कुठे आहे हे माहित नसते , आणि कुठून आत जायचे ते माहित नसते. पहा, आजूबाजूच्या लहान लहान गोष्टी नीट पहिल्याने सुद्धा किती टरी शिकायला मिळते.

एका संताबद्दल एक गोष्ट आहे; मला वाटते संत रामदासांची . ते पहाटे एका गावातून चालत निघाले होते आणि एक बाई, तिच्या झोपडीच्या बाहेर समोर झाडत होती, आणि ती म्हणाली, 'राम उठ, अजून किती वेळ झोपणार आहेस?', तिने तिचा आत झोपलेल्या मुलाला हाक मारली. एक तरुण मुलगा, ज्याचे पण नाव राम होते. जेंव्हा त्या संताने ते ऐकले , ज्याचे नाव राम होते, तो लगेच म्हणाला, ' अरे, कोणीतरी मला जागे व्हायला सांगत आहे'. असे म्हणतात की त्याच क्षणी तो खरोखरच जागा झाला. म्हणाला, 'वाह!', खरच तो इतका उत्साहित झाला. ते म्हणाले, त्यानंतर मी कधी झोपलोच नाही, मी इतका तरतरीत झालो, माझे मन सारखे भूतकाळ आणि भविष्यकाळात जाऊन उसळत होते'.

त्याला कोणीही सांगितले नाही, की तू हे केले पाहिजेस, तू ते केले पाहिजेस आणि मान तुला असे फिरवू शकते. आपले मान त्याची स्वतःची माया बनवते, स्वतःचे जग बनवते, त्याचा स्वतःचा बुडबुडा आणि आपण स्वतःच्याच बुडबुड्यात फिरत राहतो. आपण सगळे जग आपल्याच चष्म्यातून पाहत असतो आणि सगळे तसेच मनात असतो. याला विपर्याय म्हणतात.

विपर्याय म्हणजे रंगवलेली दृष्टी, बरोबर नसलेली दृष्टी. तर गुरु तत्व किंवा ज्ञान असा प्रकाश आहे की ज्याने तुम्ही खरच जागे होता अनो पाहता - ओह, हे असेच आहे!

मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असे वाटले की तुमची मते चुकलेली आहे?

पहा, बऱ्याच वेळा तुमचे निर्णय चुकले आहेत पण तुम्ही जेंव्हा निर्णयात होता, तुम्ही विचार केलात की या गोष्टी अशाच आहेत - तो बुड बुडा आहे ज्यात आपण असतो, गुरु तत्व म्हणजे बुड बुड्यातून बाहेर येणे, स्वतःच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे,  गुरु तत्व म्हणजे त्या बुड बुड्या मधून बाहेर येणे, स्वतःच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे, आयुष्याने दिलेल्या ज्ञानावर प्रकाश टाकणे. हे पहा. मग आपण पाहतो की आपले निर्णय अधिकाधिक बरोबर होत जातात. आता ९०% निर्णय चुकीचे असतील आणि १०% बरोर, हे खरेतर उलटे झाले पाहिजे. ९०% बरोबर आणि १०% चूक, २% किंवा ३% किंवा १०% चुकणे ठीक आहे.
१. तुमचे स्वतःचे आयुष्य तुमचा गुरु आहे.
२. आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. हे लहान मुलांच्या शाळेतील शिक्षकांसारखे नाही- तुम्ही काहीतरी शिकता आणि जाता आणि बस्स, पण आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहे.
३. तुमच्या आयुष्यातील ज्ञान तुमचा गुरु आहे. आयुष्यावर प्रकाश टाका आणि त्यानेच ज्ञान येते.
४.देणाऱ्याने तुम्हाला भरपूर दिले आहे आणि देत आहे, त्याचा चांगला वापर करा. आपण आपल्या क्षमतांचा जेव्हडा चांगला वापर करू तेवढे जास्त आपल्याला मिळत जाते.
५. ज्ञानाचा आदर करा. तुम्हाला माहिती आहे, ज्ञान, त्याचा आदर करा कारण गुरु आणि ज्ञान अविभाज्य आहेत आणि आयुष्य आणि ज्ञान अविभाज्य असावेत. कधी कधी आपण आपले आयुष्य ज्ञानाशिवाय घालवतो. मग तिथे गुरु तत्व नसते. तुम्ही गुरूचा आदर करत नाही. समजले. ते सदगुरू आहे.
६. धार्मिक राहा आणि धार्मिक पणा दाखवू नका. धार्मिकपणा दाखवणे तुम्हाला या ना त्या मार्गाने चूक ठरवतो आणि राग आणि निराशा आणतो. तसेच चांगले असण्याचे पण आहे. जर तुम्ही असे म्हणाल की मी चांगला आहे तर तुम्ही असा विचार करता की बाकीचे वाईट आहेत. ‘मी खूप चांगला आहे’ ते दु:खी  भाव आणते. जे लोक स्वतः खूप चांगले आहेत असा विचार करतात ते स्वतः वाईट आहे असा विचार करणार्यांपेक्षा आनंदी असतात. जे लोक स्वतःला वाईट समजतात, ते काळजी करत नाहीत, पण जर कोणी म्हणेल की ' मी चांगला आहे', तर ते विचार करतात, ' हे माझ्याबरोबर काय होत आहे'. तर मी जर असा विचार केला, ' मी खूप चांगली आहे', माझा चांगुलपणा दाखवणे मला दु:खी बनवू शकते. माझा धार्मिकपणा दाखवणे मला रागिट बनवते. चांगले राहा आणि चांगुलपणा दाखवू नका. इतरांना त्याबद्दल बोलू देत; तुम्ही स्वतःच स्वतःचा बाजा वाजवू नका. दयाळू राहा पण दयाळूपणा दाखवू नका.

आपल्याला हेच करायचे आहे - परत आणि परत परत या गोष्टी गोळा करायच्या आहेत, आणि आपल्या बुद्धीने परत परत शोषून घ्यायचे आहे. हाच सत्संग आहे. सत्संग म्हणजे सत्याबरोबर असणे, हुशारी बरोबर असणे, तुमच्या आत असलेल्या ज्ञानाबरोबर असणे. तुमच्या आतील सत्याबरोबर हात मिळावा, समजले?

देणारा देऊन दमला नाही. तो देऊन कधी दमात नाही आणि ते तुमचेच आहे अशी भावना तुम्हाला देतो. तो दयाळूपणे तुम्हाला देत आहे आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल अशी भावना देत आहे, ' अरे पहा, हे माझे आहे'. खरेतर, तुमचे काहीच नाही. पण देणारा असा देतो की तुम्हाला घेतल्यासारखे वाटत पण नाही. काय? देणारा असे देतो की ते तुमचेच आहे असे तुम्हाला वाटते, तुम्ही घेतले पण नाही, तोच मोठेपणा आहे आणि तीच सुंदरता आहे.

त्याचप्रमाणे, त्या बाईचे स्वतःच्या मुलाला उद्देशून ओरडणे त्या संताला जागे करू शकले आणि आत्मसाक्षात्कार होऊ शकला, तेच होते - बाई म्हणाली: ' राम तू किती उशीरपर्यंत झोपणार आहेस, जागा हो. कधीपर्यंत झोपणार आहेस?', उठ आणि तिथूनच रामदास स्वामींचा प्रवास सुरु झाला. तुम्ही जागे होण्यासाठी निसर्ग तुम्हाला खूप साऱ्या संधी देत आहे, तुम्ही कधीपर्यंत झोपणार आहात, तुम्ही तुमचे मन कधीपर्यंत  वापरत बसणार आहात का, का, का, का. तक्रार करणारे, रडणारे ओरडणारे मन, जागे व्हा, आयुष्य खूप कमी आहे. या कमी वेळात आयुष्याचा मन ठेवा! ते इतके अनमोल आहे. तुमची कौशल्ये आणि संसाधने , जी तुमच्या दाराशी आली आहेत यांचा चांगला वापर करा. तुमच्याकडे जे आहे त्याचा चांगला वापर करा, तुमचा आवाज, तुमची बुद्धी. कुणी कौतुक करो अथवा ना करो, तुम्ही गा.

गुरु पूर्णिमा संदेश

सोमवार, जुलै २६, २०१०
एका  वर्षात १२ - १३ पोर्णिमा येतात त्यापैकी वैशाख पोर्णिमा संबोधली जाते जन्म आणि ज्ञानासाठी, ज्येष्ठा पोर्णिमा पृथ्वी मातेला आणि आषाढ पोर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते. ह्यालाच  गुरुपोर्णिमा असे म्हणतात.

हा तो दिवस आहे जेव्हा शिष्य आपल्या गुरूंच्या परीपुर्णतेत जागे होतात आणि जागे करण्यासाठी गुरुला कृतकृत्य होतात. हा आभार द्वैत (तुम्ही आणि मी) नाही तर अद्वैत आहे. ही नदी नाही जी एकीकडून दुसरी कडे वाहत जाईल. तर हा सागर आहेत जो स्वत्वात चालतोय. म्हणून, गुरु पूर्णिमा ही कृतज्ञतेच प्रतिक आहे.

गुरुपुर्णिमा उत्सवाचा उद्देश आहे मागे वळून बघणे आणि मागच्या एक वर्षात आयुष्यात किती प्रगती केली हे पाहण. एका साधका साठी गुरुपुर्णिमा एक महत्वाचा दिवस आहे, नवीन वर्षाचा एक दिवस आहे. हा दिवस आहे एखाद्याचा अध्यात्मिक मार्गावरील प्रगतीचा आढावा घेण्याचा आणि दृढ संकल्पाला नविनिकृत करण्याचा आणि आपल्या ध्येयावर  केंद्रित करण्याचा आणि येणाऱ्या पुढच्या वर्षात काय करायचे आहे यावर मार्ग काढणे. जसा पौर्णिमेचा चंद्र उगवतो आणि मावळतो, कृतज्ञतेचे अश्रू निर्माण होतात आणि स्वतःच्या विशालतेत सामावून जातात.

तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीरात लाखो जीवकोश आहेत आणि प्रत्येक कोशाला त्याच स्वतःच आयुष्य असत.बरेच जीवकोश रोज जन्म घेतात आणि मरण पावतात. म्हणून, तुम्ही एक फिरते शहर आहात.कित्येक शहरं या पृथ्वी ग्रहावर  आहेत आणि पृथ्वी ग्रह सूर्या भवती फिरत असतो. त्याच प्रमाणे, कित्येक जीवकोश आहेत आणि कित्येक  जीवजंतू तुमच्या शरीरात आहेत आणि तुम्हाभोवती फिरतात. तुम्ही एक फिरती वस्ती आहात. एका मधाच्या पोळ्यासारख, कित्येक मधमाश्या येतात आणि त्यावर बसतात, पण तिथे एक  राणी मधमाशी असते. जर राणी मधमाशी गेली तर दुसऱ्या माश्या पण जातात.त्याच प्रमाणे,आपल्या शरीरातही परमाणु असतात राणी मधमाशी. जर ते तिथे नसेल तर, सगळाच निघून जाईल. माहित करायच, त्यात छोट्या परमानुचा सगळ्यात छोट स्वरूप, आत्मा किंवा स्वत्व.ती सगळीकडे आहे तरीपण कुठेही नाही. तीच  राणी मधमाशी आहे आणि तेच तुम्ही आहात. आणि तेच दिव्य आहे, आणि तेच गुरु तत्व आहे. ज्याप्रमाणे पितृत्व, मातृत्व, त्याप्रमाणे गुरुत्व देखील आहे. तुम्हाला कोणा ना कोणा सोबत गुरुत्व साकारावं लागत. तुम्ही खेळा, तुम्ही लोकांना जाणत्या किंवा अजाणते पणाने सल्ला द्या आणि मार्गदर्शन करा, आणि त्यांची काळजी घ्या आणि प्रेम द्या. पण हे पूर्ण १०० टक्के करा कुठलीही परतीची अपेक्षा ना करता.त्यालाच गुरुत्वात जगणे म्हणतात, स्वत्वात जगणे. दिव्य, तुम्ही आणि गुरु तत्व यात काहीच फरक राहात नाही. हे सगळ एकाच गोष्टीवर येतं, राणी माशीवर. ध्यान हे आराम आणि विश्रांती ह्यात एक परमाणु सारख आहे.

सर्व गोष्टींचा विचार करा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटतंय, आणि विचारा तुम्हाला काय हवय. आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या. आपण सर्व काही प्राप्त करतो, पण प्राप्त करणेच पुरेसे नाही, तर ज्यांना गरज आहे त्यांना आपण द्यायला हवे आणि आशीर्वाद द्यावा.
The Art of living
© The Art of Living Foundation

गुरु पोर्णिमा विशेष

बुधवार, जुलै ७ , २००९

गुरु सिद्धांत आयुष्यात महत्वपूर्ण आहे. पहिला गुरु हा दक्षिणामूर्ती आहे. अनंताचे अवतार कुशाग्रतेने विणले गेले की परिमित आणि अनंतासोबत अस्तित्वात राहतात. गुरु तत्व हे सर्व मनुष्यात आहे. ती बुद्धिमत्ता प्रत्येकात लागू आणि जागृत करायला हवी.

हे तत्व जेव्हा जागृत होते, आयुष्यातील कष्ट दूर होते. हे कष्टाचे औषध आहे, सर्व विद्येचे धन आहे.

गुरवे सर्व लोकानाम- दिव्य चेतना हा पूर्ण जगाच्या जगतातली प्रमुख प्रकाश आहे.
बिशाजे भव रोगीणाम - हे औषध आहे समाजातील रोग्यांसाठी, आयुष्यासाठी, दु:खीतांसाठी. हे सगळे कष्ट दूर करतो.
निधाय सर्व विद्यानाम श्री दक्षिनामुर्तये नमः   - मी या चेतनेला शरण जातो जे माझ्या हृद्यात आहे.

गुरु शब्दाचा अर्थ आज विशेषज्ञ म्हणून केला जातो - जसे व्यवसाय प्रबंधात विशेषज्ञ. गुरु म्हणजे असाधारण, मोठे. अर्थातच, विशेषज्ञ हा त्याचा एक भाग झाला. या सगळ्यात पूर्णता आहे. गूढता आहे. आपल्या चेतनेत, बुद्धिमत्ता तेव्हाच आयुष्यात येते जेव्हा गुरु तत्व आयुष्यात असते.जेव्हा आपल्या आयुषयात काहीच इच्छा आकांश नसतात, तेव्हा गुरु तत्व आयुष्यात येते. तुम्ही कधी कुणासाठी काही करण्याची इच्चा केली आहे त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता? मग तुम्ही गुरु होण्याची भूमिका पार पाडली.आई ही पहिली गुरु आहे. मग आपले शिक्षक येतात - विना शिक्षक  आणि इतर अनेक. सदगुरु सत्याचे ज्ञान,अंतिम वास्तविकता, अध्यात्मिक ज्ञान देतो.
गुरुपोर्णिमेला प्रत्येकाने चिंतन करावे, " मी कुठे होतो हे ज्ञान मिळण्यापूर्वी? मी आता कुठे आहे?" तुम्ही जेव्हा विपरीत बघता तुम्ही या ज्ञानाशिवाय कुठे होतात, तर आभार व्यक्त होतो.
या पोर्णिमेला व्यास पोर्णिमा देखील म्हटले जाते. व्यासांनी ही ज्ञानाची विद्या ४ वेदात श्रेणी बद्ध केली आहे, उपनिषद, उपवेद, २७ स्मृती, २७ उपस्मृती - एक मोठ्ठी ज्ञानाची विद्या जीवनाच्या प्रत्येक बाबींशी संबंधित आहेत आयुर्वेद ते वास्तुशास्त्र ते चिकित्सा ते औषध.ही पोर्णिमा त्यांच्या नावावर आहे.

हा दिवस आपण त्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवतो ज्यानी मानव जातीच्या भल्यासाठी काम केले आहे . आपण लक्षात ठेवतो त्यांनी काय केले.
तुम्ही किती नशीबवान आहात तुमच्या आत अनंत अनुभव आहेत. या विशिष्ट साच्यात शरीर आणि मन जडलेला आहे. शरीर आणि मन सीमित आहेत पण भावनेची अभिव्यक्ती अनंत आहे.
साधकासाठी, नवीन वर्ष म्हणजे गुरुपोर्णिमा आहे. जेव्हा बाकीच्या जगासाठी ही अर्धी वाट असते, आम्ही अध्यात्मिक मार्गावर पूर्ण वर्ष साजरा करतो. आपल्या जीवनात दिव्य अभिव्यक्तीच, दिशेचं एक वर्ष आहे. एक वर्ष एकरूपतेची भावना आणि जगाला गुरूच्या चक्षूने बघणे. गुरू हा मार्गदर्शन करणारा आहे. मला ते करू द्या जे एका गुरुने, एका भल्या माणसाने या परिस्थितीत केले असते. बुद्धिमान व्यक्ती कधी प्रतिक्रिया देणार नाही. ते उत्तर देतील. तुम्ही शिकाल जेव्हा स्वतःला  त्या जागी ठेवाल (गुरु किंवा बुद्धिमान व्यक्ती) पुन्हा पुन्हा अनंत धेय्याचे प्रयत्न, विशाल बुद्धिमत्ता, पूर्ण दया आणि आनंद.

कुणालाच माहित नाही ही प्रथा कधी सुरु झाली. करोडो वर्षांपूर्वी, या पृथ्वीवर, किती सारे संत आणि ऋषी होऊन गेले आणि किती तरी पुढे भविष्यात होतील. आपण त्या सगळ्यांचे ज्ञानाच्या योगदानासाठी  भूतकाळात, वर्तमानात, आणि भविष्यात आभार मानतो. बुद्धीमत्तेशिवाय हे जगणे नाही, फक्त आहेच. आयुष्याची सुरुवात बुद्धिमत्तेने होते.

या गुरुपोर्णिमेला तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले त्याबद्दल विचार करा आणि आभार व्यक्त करा. सगळे गाऊ या आणि आंतरिक आनंदात डुबून जाऊया.
The Art of living

© The Art of Living Foundation

चालत रहा आणि भाव उच्च ठेवा

बर्लिन, जुलै ४ :
भव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवानंतर बर्लिन मध्ये, स्वयंसेवकाच्या गटाने श्री श्री समोर आपले अनुभव सांगितले 

श्री श्री रवि शंकर : अडचणी हे बघण्यासाठी येतात की तुम्ही त्यातून पार होवू शकता की नाही, तुमच्यात शक्ती आहे. तुमचा भाव नेहमी उच्च असायला हवा. काही फरक पडत नाही, काही हरकत नाही, पुढे चला आणि भाव उच्च ठेवा. हा महत्वाचा धडा आहे - मग तुम्हाला घटनांचा काहीच फरक पडत नाही. अडचणीतूनच तुम्ही शिकत जातात. ह्या तात्पुरत्या अडचणी आहेत, त्यांच्याकडे हसत हसत बघा.

प्रश्न: माझे साहेब खूप हट्टी  आहेत. आमच्यात  खूप वाद  होतात. मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: सोपे आहे. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते वेगळ्या पद्धतीने म्हणा. मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. एका माणसाची बायको खूप हट्टी होती.ती नेहमी नवरा जे म्हणेल त्याच्या उलट करायची. नवरा निराश झाला आणि एका स्वामीकडे सल्ला मागण्यासाठी गेला. स्वामी त्याच्या कानात काही तरी पुटपुटले. तीन महिन्या नंतर, स्वामी त्याच्या शहरात आले आणि त्यानी त्याला आनंदित बघितले. त्याने स्वामीजींचे आभार मानले आणि म्हणाला,"तुमची युक्ती कामी आली.स्वामीजींनी त्याला सल्ला दिला जे काही पाहिजे आहे त्याच्या उलट मागायचे. उदाहरणार्थ, जर त्याला तळलेले बटाटे हवे असतील तर त्याने बायकोला बिना तळलेले बटाटे मागायचे. आपण आपल्या मनाला कसे सांभाळतो यावर अवलंबून आहे. जेव्हा संभाषण तुटून जाते तेव्हा बोलू नये. कडक लोक तुमचे गुण वाढवतात.

प्रश्न: तुम्हाला निराशा कमी करण्यासाठीच्या औषधाबद्दल तुम्हाला काय वाटत?
श्री श्री रवि शंकर: ज्ञानात राहा. ज्ञानाच्या गोष्टी ऐका आणि आपला अभ्यास रोज करा. मग तुम्ही नैराश्येत जाणार नाही. वैद्यकीय सल्ला माना आणि हळू हळू पुढे जा. सेवा करा, एका समुदायामध्ये सामील व्हा. जेव्हा तुमच्याकडे काही नसत, तेव्हा तुम्ही स्वतः बद्दल विचार करता आणि निराश होता.

प्रश्न: आम्ही कुणाला प्रार्थना करायची, तुम्हाला की देवाला? तुम्ही आमची प्रार्थना देवा पर्यंत पोहोचवाल किं तुम्हाला सरळ मिळतील?
श्री श्री रवि शंकर: प्रार्थना जन्मजात आहे. हे असे नाही जे तुम्ही मनाने करता किंवा मनात असत. ते आपोआप घडत जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते. प्रार्थना करण्यासाठी प्रयत्न करू नका. आरामात राहा.देव फक्त एकाच आहे जो सगळ्यांसाठी काम करीत असतो. तुम्ही कुणालाही प्रार्थना करा, ती एकाच देवाला जाईल जो या ब्रम्हांडाच्या निर्मितीला कारणीभूत आहे. कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका. मला तुमच्या सगळ्या समस्या द्या आणि आनंदाने घरी परत जा.

प्रश्न: तुम्ही सगळ्या प्रार्थनेचे उत्तर देता?
श्री श्री रवि शंकर: तुम्ही काय मागता या बाबत काळजी पूर्वक राहा. तुम्ही नेहमी शेवटी एक वाक्य जोडायला हव, "आणि जे काही योग्य असेल ते."

The Art of living
© The Art of Living Foundation

हे जाणून घ्या की एक शक्ती आहे जी सगळ्यांची काळजी घेत आहे आणि ती शक्ती तुमच्यावर प्रेम करते.

मोन्त्रिअल, जुलै ९:

प्रश्न: प्रिय गुरुजी, सर्व भितींवर विजय कसा मिळवावा आणि जर यश मिळाले तर या अनुभवातून काय अपेक्षा ठेवावी?
श्री श्री रवी शंकर: "सगळ्या" भीती असे काहीही नाही. फक्त एकच भीती असते आणि ती नष्ट होण्याची भीती आहे आणि निसर्गानेच ती भीती ठेवली आहे.  आणि ती नष्ट कशी होईल तर हे समजून घेण्याने की 'मी शरीर नाही, मी आत्मा आहे. '  पहिली गोष्ट. दुसरी 'माझ्याबरोबर सगळे चांगलेच होईल' एव्हडेच. तिसरे नाही.

प्रश्न: प्रिय गुरुजी, तुम्ही खूप वेळा स्वप्नात येता  आणि उत्तरे देऊन अध्यात्मिक मार्गदर्शन पण केले आहे.  हे खरे आहे का, मी यावर विश्वास ठेवू का?
श्री श्री रवी शंकर: जेंव्हा सगळे चांगले होत असेल तर..... पण गोष्टी चुकीच्या होत असतील तेंव्हा तुमचे स्वतःचे मन असते! (हशा)  हे पहा, जर तुम्हाला विचार आला, आणि तो बरोबर ठरला तर "मला अंतर्ज्ञान झाले असे म्हणता.  जर ते सत्य परिस्थितीबरोबर जुळले नाही तर तुम्ही त्याला "मला अंतर्ज्ञान झाले" असे म्हणत नाही'.तुम्ही कसे म्हणता? "मला भास झाला". भास आणि अंतर्ज्ञान यातला फरकच हा आहे की भास बरोबर नसतो.

प्रश्न: महत्वाचे काय आहे, आनंद की कर्तव्य?
श्री श्री रवी शंकर : दोन्ही.  तुम्ही तुमचे कर्तव्य केले पाहिजे आणि आनंदी पण राहिले पाहिजे. तूम्हाला दोन्हीमधला पर्याय का हवा आहे? हं....जर पर्याय असेल तर कर्तव्य आधी करा, तुम्ही आनंदी नसला तरी ते तात्पुरते असेल. ..बरोबर?  आनंद तर आहेच, तो येईल. पण जर तुम्ही कर्तव्यापेक्षा आनंदाला निवडले तर शेवटी तुम्हीच दु:खी  व्हाल.  सुरुवातीला थोडे दु:खी राहणे हे नंतर कायम दु:खी राहण्यापेक्षा कधीही चांगले.

प्रश्न: गुरुजी, कृपया कर्मांचे नियम सांगा, मी शारीरिक त्रासांपासून कसा मुक्त होऊ आणि निःस्वार्थी सेवा कशी करू? माझा शारीरिक आजारांमुळे मी कार्यरत, प्रेमळ आणि आनंदी राहू शकत नाही. मी लौकर दमतो. कृपया मार्गदर्शन करा. खुप सारे प्रेम.
श्री श्री रवी शंकर: तुम्हाला माहिती आहे, त्याची काळजी करू नका हे सर्वोत्तम आहे. कळले? कर्म फक्त मनात असते, तरी तुम्ही शारीरिक आजारांबद्दल काळजी करता "अरे ही माझी कर्मे आहेत....." पहा, शरीराची त्याची मर्यादा आहे. प्रत्येकाच्या शरीराला मर्यादा आहेत. आपण निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्याचे तोटे सहन करायलाच लागणार आहे.  ठीक  आहे?  तुमचे  मन मजबूत ठेवा, आणि बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घ्या.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मला परमानंद कधी आणि केंव्हा मिळेल?
श्री श्री रवी शंकर: काही शक्यता नाही (हशा) . नाही. विसरून जा. तुम्ही विसरून जायला तयार आहात का? मग तुम्हाला आत्ता कळेल. तुमचे मन " परमानंदाबद्दल, मला एक दिवस परमानंद मिळवायचा  आहे....." याबद्दल चिंतीत आहे.

प्रश्न: माझ्या हृदयाला पुढे जायचे आहे पण मन जाऊ देत नाही, मी काय करू गुरुजी? आभारी आहे.
श्री श्री रवी शंकर त्यांचे सतत भांडण होतच असते. जसे वृद्ध जोडपे सारखे भांडत असते (हशा)

प्रश्न: मी अशा चुका केल्या आहेत की त्याचा परिणाम इतरांवर पडला आहे अशा परिस्थितीत मला शांतता कशी मिळेल?
श्री श्री रवी शंकर: तुम्ही योग्य जागी पोहोचला आहात.

प्रश्न: प्रिय गुरुजी, नमस्कार. मोठे बक्षीस मिळवण्याच्या इच्छेने लॉटरीचे तिकीट घेतले तर चालेल का? (हशा) की ते पैसे घेणे चांगले नाही. कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री रवी शंकर: काहीच बोलायचे नाही. मला तुमच्या मनात दुसरे द्वंद्व निर्माण करायचे नाही.

प्रश्न: गुरु पौर्णिमेची इच्छा म्हणून मी लॉटरीचे बक्षीस मागू शकतो का?
श्री श्री रवी शंकर: मन किती गमतीदार वागते! फार काही न करता लॉटरी हवी आहे. छान छान छान छान.

प्रश्न: जय गुरु देव गुरुजी, कृपया मला माफ करा.
श्री श्री रवी शंकर: केले.

प्रश्न: प्रिय गुरुजी, पतंजली म्हणतात की योग तुम्हाला मुक्ती देऊ शकतो. आदिशंकर म्हणतात की फक्त ज्ञानच मुक्ती देऊ शकते. कृपया समजावून सांगा.
श्री श्री रवी शंकर: आणि तुम्ही विसरलात की भक्ती सूत्र सांगते की फक्त समर्पणच मुक्ती देऊ शकते! जोडले जाणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. विचाराने बुद्धी शुद्ध होते. तुम्ही जर बुद्धीजीवी असाल तर बुद्धी हेच परम आनंदात राहण्यापासून दूर ठेवते. मन मध्ये येते आणि प्रश्न विचारात राहते, शंका घेत राहते.
ज्ञानातून बुद्धी शुद्ध होते.
योगाने शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो.
प्रेम/समर्पणाने हृदय शुद्ध होते.

तुम्ही एक रस्ता निवडला तर बाकीचे दोन रस्ते बरोबर येतात.  ते होईल, ते होते. योग म्हणजे एकत्र येणे आणि एक होणे आणि जर तुम्ही हृदयःचा मार्गाने गेलात, नक्कीच आपोआप एकी होईल आणि जेंव्हा एकत्र येणे होते तेंव्हा ज्ञान येते.ज्ञान मार्गाने जा - जोपर्यंत ज्ञान प्राप्तीचा उत्साह नसेल तोपर्यंत ज्ञानात कसे जाणार?  उत्साहाचा पाया प्रेम आहे. तर, ज्ञानामध्ये प्रेम पण आहे. जर ज्ञानाबद्दल प्रेम नसेल तर त्यासाठी उत्साह पण येणार नाही. म्हणून तुम्ही जरी ज्ञान मार्गाने गेलात तरी तिथे प्रेम आहेच, फक्त लपलेले आहे. आते बरोबर येते आणि फुलते.  जेव्हडे जास्त तुम्हाला माहिती होईल तेवढे जास्त तुम्ही त्यावर प्रेम कराल, तेवढे जास्त तुम्हाला ते आवडेल. हे एक रहस्य आहे. हं?  इंग्रजी म्हण आहे ' अतिपरिचयात अवज्ञा' ठी अतिसाय उथळ आहे. तुमचा तेवढा परिचय होईल, तेवढे जास्त प्रेम त्यात तुमच्यासाठी फुलेल. बरोबर? म्हणून, तुम्ही ज्ञानातून जा अथवा प्रेमातून जा अथवा योगामधून जा. योगामध्ये कर्म योग, कृत्य पण येते. योग म्हणजे एकत्रित येणे. बाकीचे दोन बरोबर येतात.

प्रश्न: तुमचे ज्याचावर प्रेम आहे आणि ते विरोध करत असतील तरी त्यांना अध्यात्मिक मार्गावर कसे आणावे? मी प्रयत्न करत राहतो पण त्याचा की उपयोग होताना दिसत नाही.
श्री श्री रवी शंकर : प्रयत्न सोडू नका.  तुमच्या सर्व युक्त्या वापरा. प्रश्न असा आहे की जर कोणी विरोध करत असेल तर त्यांना अध्यात्मिक मार्गावर कसे आणावे. मी म्हणेन, प्रयत्न करत राहा, परत प्रयत्न करा आणि करत राहा. जर ते हट्टीपणा करत असतील तर तुम्ही जास्त हट्टी व्हा.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही कोण आहात आणि काय आहात यावर मला शंका घ्यायची नाही पण तरीसुद्धा शंका आहे. मी काय करावे?
श्री श्री रवी शंकर: काही हरकत नाही, तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे जास्त शंका घ्या. तुम्ही शंका घेण्याला माझी काही हरकत नाही. जाणून घ्या की आपण ज्याचावर शंका घेतो ते नेहमी चांगले असते. आपण प्रेमावर शंका घेतो, रागावर नाही. आपण आपला क्षमतांवर शंका घेतो, आपला कमतरतांवर नाही. आपण आपल्या आनंदावर शंका घेतो. आपला शंकांचा स्वभाव जाणून घ्या.

प्रश्न: गुरुजी, आडमुठ्या लोकांचा राग निघून जाण्यासाठी, ज्यांना अध्यात्मिक मार्गावर यायचे नाही त्यांना कशी मदत करावी?
श्री श्री रवी शंकर: तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला स्वातंत्र्य द्या. तुम्ही कोणावर ताबा ठेवू शकत नाही. ही व्यक्ती अशीच आहे, तुम्ही त्यांचे काय कराल? आपल्या काही कुणाला काही सांगण्याने ते बदलणार नाही आणि तुम्ही कुणावर ताबाही ठेवू नये.  माझा निष्कर्ष हा आहे, काय? कुणावरही ताबा ठेवू नका. त्यांना ज्या मार्गाने जायचे त्या मार्गाने जाऊ द्यात.  त्यांनी ऐकले तर फक्त त्यांना मार्गदर्शन करा, तसेही हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काय करू शकता?

तुम्हाला मी काय सांगतोय ते समजत आहे का? तुम्ही त्यांच्यावर ताबा ठेवायचा प्रयत्न करा - तुमची मुले, पती-पत्नी आणि मित्र - कुठलाही हेतू न ठेवता;  तुमचे त्यांना ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात काहीच वाईट हेतू नाही. पण ते जेंव्हा रागावतील तेंव्हा तुम्ही काय करू शकता?  तुम्हाला माहिती आहे, तुमच्या ताबा ठेवण्याच्या प्रयत्नामुळे तुम्हाला राग येतो.  ज्या क्षणी तुम्ही ताबा ठेवणे थांबवलं , त्या क्षणी तुमचा राग नाहीसा होईल, कळले? हं?  जेंव्हा कोणी तुमचे ऐकत नाही तेंव्हा तुमची चीड चीड होते, बरोबर? तुम्ही त्यांना दहा वेळा सांगता तरी ते तुमचे ऐकत नाहीत, आणि मग तुम्हाला काय मिळते? चीडचीडेपणा.  तेंव्हा तुमचे ज्ञान पुढे आले पाहिजे ' ठीक आहे, हा माणूस असाच असायला पाहिजे. तुम्ही काय करू शकता?  जय गुरु देव!' मग लगेच काय होते? कमीत कमी तुमचा मेंदू आरामात राहतो, तुमची चीड चीड होत नाही.

मग, मी काय म्हणालो? कुठल्याही परिस्थितीवर, माणसावर ताबा मिळवणे सोडा.  तुम्ही शांत असा; ताबा मिळवण्याची इच्छा ही खरी अडचण आहे. तुम्हाला कळले का? कुठल्याही  परिस्थितीत गोष्टी घडत राहतील, या अथवा त्या मार्गाने.  तुमच्याकडून जितके जास्त चांगले होईल तेवढे करा आणि बाकीचे सोडून द्या. संपले. कळले?

आता, याचा अर्थ आळस, नेतृत्व, पुढाकार घेणे किंवा सुव्यवस्था यांचा बरोबर गोंधळ घालू नका. मी काय सांगतोय ते कळत आहे ना? ही तारेवरची कसरत आहे. हुशार माणसाला ताबा न ठेवता पुढाकार घेणे जमते, कळले? ताबा मिळवण्याचा प्रयत्न न करता पुढाकार घ्या.  आणि एक वेळा नाही तर दहा वेळा सांगायचे धैर्य ठेवा.  अगदी पहिल्यांदाच असे म्हणू नका  की, "मी सांगितले आणि त्या माणसाने ऐकले नाही" नाही. तुम्हाला ते दहा वेळा सांगण्याचे धैर्य पाहिजे आणि तरी त्यांनी ऐकले नाही तरी तुम्ही काळजी करू नका.

हेच ज्ञान आहे, दहा वेळा सांगण्याचे धैर्य असणे. त्यांनी एकदाही केले नसताना तुम्ही दहा वेळा कसे सांगाल? तुम्ही म्हणता " अरे, ते करत नाहीत, ते तसेच आहेत" तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आळशी आहात, तुम्ही पुढाकार घेत नाही, तुमच्यामध्ये प्रतिबद्धता नाही. मी तुम्हाला एक अतिशय अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आहे, तुम्ही ऐकत आहात ना? तुम्ही एखाद्या गोष्टीशी बांधील असाल तर तुम्ही काय करता- तुम्ही करत राहता... बरोबर?

समजा तुम्हाला लाकूड कापायचे आहे, तुम्ही एकदा कापता, जर लाकूड मऊ असेल तर लगेच कापले जाते. पण जर लाकूड कडक असेल, तर तुम्ही काय करत राहता? मारत राहता. किती वेळा? ते तुटेपर्यंत. तुम्ही मारत राहता. आपण काय करतो, आपला मनात सर्वांसाठी एकच मापदंड असतो.  आपण म्हणतो की, "अरे, हे लाकूड एका फटक्यात कापले गेले म्हणजे सगळीच लाकडे एका फटक्यात कापली जाणार” आणि मग आपल्याला राग येतो. नाही.  काही कडक असतात काही मऊ असतात. प्रत्येकाला त्याचा त्याचा वेळ लागतो कापले जाण्यासाठी. आणि जर कापले जात नसेल तर ते लाकूड नाही, मग तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी बोलवा.

तुम्ही शांततेत आहात. हा माझा निष्कर्ष आहे. काय? ताबा ठेवू नका, त्यांना ज्या मार्गाने जायचे त्या मार्गाने जाऊ देत. पण त्यांना मार्गदर्शन करत राहा; ते ऐकत नसतील तर ते त्यांच्याच डोक्यावर चिखल उडवून घेत आहेत. तुम्हाला माहिती आहे, हत्तीला अंघोळ घालायला चार-पाच लोक लागतात. कधी कधी ते हत्तीला खाली झोपायला लावतात आणि बादल्या बादल्या पाणी ओततात. तुम्ही हत्तीला अंघोळ करताना बघितले आहे का? नाही? अरे, तुम्ही जेंव्हा बेंगलोरला याल तेंव्हा एक नाही दोन हत्ती आहेत. घासायला दोन तास, स्पा बाथ सारखे करतात! रोज त्यांना घासले जाते, आणि पाणी ओतले जाते.  मग, ते चमकतात, दहा मिनिटे त्यांना सोडा आणि ते चिखल सगळीकडे उडवतात. त्यांना काही कळत नाही, 'मी आताच अंघोळ केली आणि मी माझ्यावर परत चिखल उडत आहे’. ज्या क्षणी त्यांना चिखल आणि माती दिसते, ती ते उचलतात आणि स्वतःच्या डोक्यावर उडवतात आणि परत मळतात (हशा) काय करायचे? हं.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मैत्रीपूर्ण राहण्याव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कसे मित्र असावेत? आणि जर ते माझ्या बाजूने उभे राहत नसतील किंवा माझ्यावर विश्वास ठेवत नसतील तर काय करावे?
श्री श्री रवी शंकर: ऐका, कोणालाही विश्लेषण करू नका. हा एक निष्कर्ष आहे. कोणाचेही विश्लेषण करणे थांबवा. कुणाचेही विश्लेषण करायला वेळ कुठे आहे, आणि तुमचेही विश्लेषण करू नका. आरामात राहा, प्रत्येक गोष्टींची काळजी घेणारी शक्ती आहे आणि ती शक्ती तुमच्यावर प्रेम करते. हे जाणून घ्या आणि आरामात राहा. बरोबर? सर्वोत्तम कल्पना? तुम्ही शांत राहा, आणि तुमची मदत होईल. दुसरे कोणी तुम्हाला मदत करणार नाही; तुमचे तुम्हालाच करायला लागेल. आणि निसर्ग आपल्याबरोबर आहे,  आपल्याबरोबर एक शक्ती आहे की जी दुसरे कोणी समजू शकत नाही., आपण स्वतः सुद्धा नाही.  म्हणून, त्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि आरामात राहा.

प्रश्न: प्रिय गुरुजी, तुम्हाला माहिती आहे का की मला काही वाईट गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी सेवा आणि पार्ट २ शिबीर दर तीन महिन्यांनी करायचे आहे. पण माझ्या कुटुंबातील लोकांमुळे मी ते करू शकत नाही. गुरुजी, काय करू? कृपया मदत करा.
श्री श्री रवी शंकर: वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही वेबकास्ट बघत आहात; जिथे आहात तिथे ध्यानाला बस. हं. हो. हे तुमच्या अस्वस्थपणाचे कारण नसावे. ठीक आहे? इतके ज्ञान आहे., ध्यानाच्या इतक्या सी.डी. आहेत. ते रोज करा. तुमची साधना करा; कोणीही तुमचा ध्यान करण्याचा हक्क काढून घेऊ शकत नाही. वेळ काढा आणि तुमचे ध्यान करा.  हे ज्ञान तुमच्या जागृतावस्थेत ठेवा. एवढे पुरेसे आहे. संधी नक्कीच येईल, आणि तुम्हाला सांगायला लागणार नाही, ' दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी' असे.. हं? जेंव्हा शक्य असेल तेंव्हा या, आणि जर एक वर्षात एकदाही झाले नाही तर आणखी थोडे प्रयत्न करा.  कमीत कमी वर्षातून एकदा एडव्हान्स कोर्स करा.

प्रश्न:  प्रिय गुरुजी, तुम्ही देव, प्रेम पहिले आहे का?
श्री श्री रवी शंकर: अरे, तू स्वतःला पाहिले आहेस का? आरशामध्ये नाही. देव काही डोळ्यांनी बघायची वस्तु नाही. तुम्हाला ते माहिती करून घेतले पाहिजे. तुम्ही देवाला बघितले असे म्हणत असाल तर त्याचा अर्थ  देव कुठेतरी आणि तुम्ही कुठेतरी असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही दर्शक आहात आणि ते दृश्य. देव कधीही दृश्य असू शकत नाही, देवच दर्शक आहे, नजर ठेवणारा......हं?  आणि तुम्ही आहात, तुम्ही ते असू शकता. जेंव्हा मन स्थिर असेल तेंव्हा तुम्ही तिथे असू शकता, त्याचा आधी नाही.

प्रश्न: प्रिय गुरुजी, माझ्या बहिणीला एक जण आवडतो पण माझे कुटुंब परवानगी देणार नाही. माझा विश्वास आहे की ही तिची निवड आहे. मी जर तिला या माणसाबरोबर राहू दिले तर मी माझ्या घरच्यांशी खोटे बोलल्यासारखे होईल की जे मला करायचे नाही. मी काय करू?
श्री श्री रवी शंकर: शांतता बनवून ठेवा. हो. तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितले नाही तर दोन्हीकडून फसवल्यासारखे होईल, त्यांना वाटेल की तुमच्या बहिणीने त्यांचाबद्दल आदर ठेवला नाही आणि तुमच्यावरच विश्वास पण जाईल. ते चांगले नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांना कल्पना द्या. आणि जर तुम्हाला असेल वाटले की ही व्यक्ती योग्य आहे तर तुम्ही वकील पण बना (हशा)
The Art of living

एक देवत्व, एक माणुसकी, विविधतेचा उत्सव, हेच आपले पवित्र कर्म आहे.

बर्लिन, जुलै २-३. आर्ट ऑफ लिव्हिंग ची ३० वर्षे पूर्ती सोहळा

वर्ल्ड कल्चर फेस्टिवल मधील श्री श्री रवि शंकर यांच्या भाषणातील काही अंश 

जिथे लोकांमधील भिंती नाहीशा झाल्या अशा या शहरात येऊन मला खूप आनंद होत आहे, आता विविध सभ्यता आणि संस्कृतींमधील भिंती नाहीशा होण्याची वेळ आली आहे.  आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपल सगळ "जग एक कुटुंब आहे".  आपण सगळ्यांना प्रेम, दया आणि सेवेच्या भावनेमध्ये एकत्र आणले पाहिजे. 

आम्ही जेंव्हा सुरुवात केली, आमची एक कल्पना होती, आजच्या कार्यक्रमाचा विषय 'इंद्रधनुष्याचे रंग' असेल आणि पाऊस आला आहे! कठीण परिस्थितींमध्ये गाणे हेच दाखवते, की आपण काहीतरी मिळवले आहे. 

परिस्थिती कशीही असो, एक कुटुंब बनुन आम्ही जगाची सेवा करणे चालूच ठेवू, . विविधता आणि या ग्रहावरील जीवन यांचा उत्सव साजरा करायची ही वेळ आहे. आम्हाला खात्री आहे की सर्व स्वयंसेवकांच्या मदतीने, आमच्या मुलांसाठी तणाव-मुक्त, हिंसाचार मुक्त समाज घडवू शकतो. दारिद्र्य नसलेला, विविधतांचा उत्सव करणार आणि देवत्वाशी जोडलेला.' एक देवत्व, एक माणुसकी, विविधतेचा उत्सव, हेच आपले पवित्र कर्म आहे. '

The Art of living
© The Art of Living Foundation